सख्या बहिणी बनल्या PSI, घरातील चौघेही अधिकारी; अंजली बाबर राज्यात दुसऱ्या सोलापूर. कोंढारपट्टा नेवरे तालुका माळशिरस येथील हरिदास बाबर यांच्या दोन्ही कन्या कौशल्या हरिदास बाबर व अंजली हरिदास बाबर या दोघींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या PSI परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्या दोघी कोंढारपट्टा गावचे माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या बहिणी आहेत. अंजली बाबर हिने महाराष्ट्रामध्ये मुलीमधून ४०८ गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. अंजली बाबर हिने उच्च शिक्षण घेण्यासाठी बारामती येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुणे येथे मॉडर्न कॉलेज येथे बीसीएस केले, तर कौशल्या बाबर हिने शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथे अकरावी, बारावी शिक्षण घेतले. त्यानंतर मेथवडे येथे बी फार्मसी केले. त्यानंतर बारामती माळेगाव येथे एम फार्मसी केले व त्यानंतर अंजली व कौशल्या हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सात वर्षे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करून यावर्षी दोघी बहिणींनी पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत. हरिदा...
समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. सिंदखेडराजा ( परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहित...
Tata Group करणार भारतातील पहिल्या iphone ची निर्मिती; ऑगस्ट महिन्यात करार होणार पुर्ण बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या टाटा समूह (Tata Group) देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त प्रमाणात भर देत आहे. नुकतीच टाटा समूहासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूह आता आयफोन निर्मितीच्या मार्गावर आहे. यासंदर्भात टाटा समूह कर्नाटकमधील विस्ट्रॉन कॉर्पसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. हा करार ऑगस्ट महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 14 आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग करणार – (Tata Group) जर या दोन्ही कंपन्यांचा करार निश्र्चित झाला तर टाटा समूह (Tata Group)आयफोन निर्माण करणारी भारतातील पहिली कंपनी ठरेल. त्यामुळे लवकरच आपल्याला बाजारात टाटा समूहाचा पहिला आयफोन पाहिला मिळू शकतो. मुख्य म्हणजे, या प्रकल्पाचे मुल्य ६० कोटी डॉलरपेक्षा अधिक असेल. तसेच या प्रकल्पात १४ आयफोन मॉडलचे असेंम्बलिंग केले जाईल. 10, 000 पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार- टाटा समूहाच्या या करारामुळे देशातील १०,००० पेक्षा अधिक लोकांना बेरोजगार मिळणार आहे. पुढील वर्षापर्यंत कर्नाटक येथील प्रकल्पात १.८ अब्ज...
Comments
Post a Comment